 |
आम्ही आणि आमचे
बाप
|
यावर्षी संक्रांतीनिमित्त मित्रमंडळाने
'आम्ही आणि आमचे बाप' हा अगदी आगळावेगळा कार्यक्रम १३
जानेवारी २०१९ रोजी सादर केला. पु.ल.देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर
आधारित एक 'trip down the memory lane' असे या
कार्यक्रमाचे
थोडक्यात
वर्णन करता येईल. पु.ल. आणि
अत्रे यांना 'साहित्यिक' किंवा
'नाटककार' असे एकच
विशेषण लावता येणे
कठीण
आहे. साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, टीव्ही, पत्रकारिता अशा कितीतरी
क्षेत्रांत दोघांची कामगिरी अतिशय थोर आहे. त्यातच या वर्षी पु.लं.ची जन्म शताब्दी
असल्यामुळे त्यांच्यावर एक सिनेमा आणि इतरही खूप काही लिहून येत आहे. त्यामुळे कार्यक्रम
जाहीर झाल्यापासूनच त्याच्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
 |
सर्वांचे लोकप्रिय
कलाकार
|
या कार्यक्रमात
मराठीतले चार प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार भाग घेणार होते. अतुल परचुरे,
आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री खूपशा नाटक,
सिनेमा आणि मालिकांमुळे सर्वांना परिचित आहेत. अजित परब
मराठी संगीत रसिकांत त्यांच्या गायन आणि संगीत दिग्दर्शनामुळे लोकप्रिय आहेत. त्यामुळे
हा कार्यक्रम जाहीर होताच
केवळ २-३ आठवड्यात 'हाऊसफुल्ल' झाला.
 |
अजित परब
|
कार्यक्रमाची
सुरवात अजित परब यांच्या 'माझे जीवनगाणे'
या गाण्याने झाली आणि तिथूनच रसिकांची आनंदयात्रा सुरू झाली. गाणी,
नाट्यप्रवेश, पु.लं. आणि
अत्र्यांच्या आयुष्यातले किस्से, त्यांच्या निवडक
लिखाणाचे
वाचन,
असे सर्व काही एकामागोमाग एक समोर येत गेले. तीन तास सर्वांना खिळवून
ठेवत सर्वच कलाकारांनी रसिकांचे भरपूर मनोरंजन केले.
 |
'व्यक्ती आणि वल्ली'तला 'नाथा कामत' |
 |
जाफराबादचा जहागीरदार
|
कार्यक्रमातले
सर्वच नाट्यप्रवेश खूप रंगले. अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री यांनी 'व्यक्ती आणि
वल्ली'तला
'नाथा कामत' रंगवला. त्यातला पुष्करचा 'महिरण्या'चा अभिनय लक्षात राहील. रोमँटिक नाथा आणि साधेसुधे
पु.लं. यांतला
contrast
खूप छान जमला आहे. यात अतुल परचुरे हुबेहूब पु.लं. सारखे
दिसतात. अत्रेंच्या 'भ्रमाचा भोपळा'
नाटकातला जाफराबादच्या जहागीरदाराचा प्रवेशही प्रेक्षकांच्या प्रचंड
हश्या आणि टाळ्या घेऊन गेला. जाफराबादचे जहागीरदार झाले होते अतुल परचुरे, आणि त्यांची दिशाभूल करायला आले होते पुष्कर आणि आनंद. सर्वच कलाकार अनुभवी
आणि मातब्बर असल्यामुळे त्यांचे एकमेकांतील coordination
एकदम जबरदस्त आहे.
 |
'वाऱ्यावरची वरात' मधला म्हादबा
|
 |
'तो मी नव्हेच ' मधला 'लखोबा लोखंडे'
|
आनंद इंगळेंनी
'वाऱ्यावरची वरात' मधला म्हादबाच्या साक्षीचा प्रसंग अतिशय
उत्तम सादर केला. (त्यातली रामायणाची कथा प्रेक्षकांतल्या एका लहान मुलीला खूप आवडल्याचं
तिने बाहेर जाताना आमच्या 'feedback' घेण्याऱ्या कार्यकर्त्यांना
आठवणीने सांगितलं. यावरून हेही लक्षात येतं की मोठयांप्रमाणेच लहानांनाही हा कार्यक्रम
खूप आवडला.) तसाच लक्षात रहाण्यासारखा अत्र्यांच्या 'तो मी नव्हेच
' मधला 'लखोबा लोखंडे' रंगवला पुष्कर श्रोत्री यांनी.
अजित परब हे एक
मान्यवर संगीतकार आणि उत्तम गायक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भाई' या पु लं च्या आयुष्यावरील चित्रपटाला त्यांनी संगीत
दिलं आहे. त्यांनी पु.लं. आणि आचार्य अत्रेंनी
लिहिलेली आणि स्वरबद्ध
केलेली
काही निवडक गाणी सादर केली. सर्वच गाणी उत्तम म्हटली होती. त्यात विशेष उल्लेख करता
येईल 'उगवला चंद्र पुनवेचा', 'माझे जीवनगाणे' आणि 'इंद्रायणी काठी'
या गाण्यांचा.
याशिवाय या दोन्ही
महान व्यक्तींच्या आयुष्यातले काही गंमतशीर तर काही त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे किस्से
झाले. काही निवडक लेखनाचं वाचनही केले. अत्रे आणि पु.लं.नी समाज प्रबोधनाचं जे कार्य
केलं त्याचीदेखील थोडक्यात माहिती दिली गेली.
एक गोष्ट अतिशय
स्पष्ट होती,
की
चारही कलाकार अत्र्यांचे आणि पु.लं.चे भक्त आहेत. सध्या भाषा अतिशय अशुद्ध होत चालली
आहे,
नवीन पिढी पुस्तक वाचनापासून दूर होत चालली आहे, या गोष्टींबद्दल त्यांना
वाटणारी चिंता त्यांनी खूप मार्मिकपणे व्यक्त केली. कार्यक्रमाआधी त्यांना हॉटेलहून
घेऊन यायचे
काम
माझ्याकडे होते.
त्यावेळेस ज्या थोड्या गप्पा झाल्या, त्यावरून असे जाणवले की
हे सर्वच कलाकार खूप यशस्वी आणि लोकप्रिय असूनही एकदम 'down
to earth' आहेत.
 |
Infosys
Foundation च्या अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध लेखिका
सुधा
मूर्ती देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी नाटकाच्या सर्व टीमचे कौतुक
केले आणि सगळ्यांना प्रत्येकी २५,००० रुपयांचे बक्षीसही दिले.
|
एकंदरीत
कार्यक्रम सर्व प्रेक्षकांना खूप आवडला. अनेकांनी बाहेर जाताना दिलेल्या
प्रतिक्रिया एकत्रित करून आम्ही त्याची एक छोटीशी 'व्हिडिओ क्लिप' बनवली आहे. ती बघण्यासाठी इथे क्लिक करा - Audience Feedback Video
(कार्यक्रमात घेतलेले फोटो मंडळाच्या फेसबुक page वरही पहाता येतील.)
मित्रमंडळ सर्व कलाकार, सहाय्यक,
sponsors, मंडळाचे
कार्यकर्ते, आणि प्रेक्षकांचे मनापासून आभारी आहे. यापुढील
कार्यक्रम देखील असेच यशस्वी होतील, अशी आशा करूयात.
Uttam Adhava!
ReplyDelete