आज सुर्यावलोकन आणि निष्क्रमण ह्या संस्कारांबद्दल
विचार चालू असताना मन आजोळ्च्या घराकडे धावले, अगदी बहिणाई च्या कवितेतल्या
पाखरा सारखं. आजोळचा चौसोपी वाडा, शेणाने सारविलेली जमीन, पाण्याचे २ आड, सरपणाची रास, दुभत्याचे कपाट सगळं क्षणार्धात डोळ्यासमोर आले. त्याच बरोबर डोळ्यासमोर
आली ती अंधारी खोली आणि त्यात दरवळणारा वेखंडाचा वास. ही अंधारी खोली म्हणजे बाळंतिणीची
खोली. माजघर आणि स्वयंपाकघर ह्याच्या मधली. तिला एकच खिडकी ती सुद्धा
माजघरात उघडणारी! ह्या खोलीत एक वेगळीच ऊब जाणवायची, कदाचित मातृत्वाची असेल. सव्वा महिना बाळ बाळंतिणीचा
मुक्काम ह्या खोलीत असायचा. घरी येणाऱ्या पै पाहुण्यामुळे बाळाला infection होऊ नये ह्याची खबरदारी. जन्मानंतर सव्वा महिन्याने
बाळाला खोलीबाहेर आणले जायचे.

चांगला दिवस बघून
देवळात नेले जायचे. ही कृती पूर्वजांनी सूर्यावलोकन व निष्क्रमण ह्या संस्कारात
गुंफली आहे. बालसंगोपन
शास्त्रानुसार दुसऱ्या महिन्यात बाळाची नजर स्थिर होते आणि ते वेगवेगळ्या
गोष्टींचे निरिक्षण करायला लागते. आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देते. वरील संस्कारांमध्ये बाळाला सूर्य, चंद्र, आजुबाजूचा परिसर हयांचे दर्शन घडवून त्याची
धारण शक्ती उददीपीत केली जाते.
पाचव्या, सहाव्या महिन्यात बाळ आधाराने जमिनीवर बसू लागते. हा भूमीस्पर्श सुध्दा
संस्कारमय करण्याची आपली संस्कृती! हा संस्कार म्हणजे "कटीसूत्रधारण". ह्यामध्ये
बाळाच्या कमरेला आपल्या आवडीनुसार चांदीचे अथवा रेशमाचे कटीसूत्र
बांधायचे, त्याला जमिनीवर बसवायचे आणि धरणी मातेला प्रार्थना
करायची "रक्षेनं वसुधे देवी सदा सर्वगतं शुभे". सहाव्या महिन्यानंतर बाळाचा
जामिनीवरचा वावर वाढणार असतो अशा वेळी त्याला जमीन बाधू नये हा ह्या संस्कारा मागील
उद्देश.

जाणकार सांगतात. हा घनआहार खिरीच्या रूपात सुरु करावा. तांदळाची, दूध, तूप आणि साखर घालून मऊसूत
खीर बनवावी. ती निवल्या नंतर त्यात थेंबभर दही व मध घालून बाळाला
भरवावे अशी ग्रंथांमध्ये नोंद आहे. ह्या अन्नप्राशना नंतर बाळाला इतर चवींची ओळख करून
दयावी.
ह्या पुढचा संस्कार म्हणजे "जावळ". जावळ चा अर्थ आहे , जन्मतः डोक्यावर असलेले
केस काढून टाकणे. मुलगा आणि मुलगी दोघांचेही जावळ काढण्याची आपल्याकडे
प्रथा आहे. बाळाच्या डोक्याला लोणी आणि हळद लावून जावळ काढावे
असे शास्त्र सांगते. जुन्या काळातील antiseptic cream ! जावळ काढण्याने मस्तकावरील
त्वचेला शुद्ध हवेचा पुरवठा होतो आणि त्वचारोग
होण्याची शक्यता कमी होते. सुश्रुताच्या मते हा
एक हर्षवर्धक, उत्साहवर्धक संस्कार आहे.

असे हे औक्षण बाळाला प्रकाशाकडे, उन्नतीकडे घेउन जाणारे आहे. आता वाचकांनी विचार
करायचा आहे कि वाढदिवसाला मेणबत्त्या विझवून टाळ्या वाजवायच्या का ओवाळून आर्शिवादरूपी
टाळ्या वाजवायच्या ...
- आरती जोशी
No comments:
Post a Comment